Effect: देशातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आगामी सत्र २०२२-२३ पासून नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने शाळांचा अभ्यासक्रम आणि पुस्तके कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. करोना महामारीचा देशातील शिक्षण क्षेत्रावर झालेला परिणाम पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. महामारीच्या उद्रेकामुळे देशातील शाळा बराच काळ बंद होत्या. सध्या करोनाच्या केसेसमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराचा धोका असून देशातील विविध राज्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अनेक शाळांमध्ये संसर्गाची प्रकरणेही समोर येत आहेत. त्यामुळे शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF) येण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता, NCERT ने येत्या वर्षापासून सर्व वर्गांची पुस्तके आणि अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी NCERT चे प्रभारी श्रीधर श्रीवास्तव यांनी १५ डिसेंबर २०२१ रोजीच सर्व विभाग प्रमुखांना तज्ञांचा आढावा घेण्याचे आदेश दिले होते. विभाग प्रमुखांना २८ डिसेंबर २०२१ पर्यंत अहवाल पाठवायचा होता. माहितीनुसार, २०२२-२३ या शैक्षणिक सत्रासाठी प्रस्तावित बदलांसह पुस्तके प्रकाशनासाठी पाठवण्याचे आदेशही संचालकांना देण्यात आले आहेत. आम्ही सध्या राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF) तयार करण्याच्या प्रक्रियेत आहोत. एनसीएफवर आधारित पुस्तके येण्यास थोडा वेळ लागू शकतो. एनसीईआरटीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात लवकर सुधारणा करण्यासाठी आगामी सत्रासाठी टप्प्याटप्प्याने काम करणे आवश्यक असल्याची माहिती एनसीईआरटीचे प्रभारी श्रीधर श्रीवास्तव यांनी दिली. नवीन पुस्तके कधी येतील? कोरोना महामारीच्या काळात देशभरात ऑनलाइन अभ्यास करण्यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन २०२२-२३ या सत्रापासून शालेय पुस्तकांचा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे देखील हा निर्णय घेण्यामागचे कारण आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF) वर आधारित नवीन पुस्तके NCERT द्वारे २०२३-२४ या वर्षाच्या सत्रापासून जाहीर केली जाऊ शकतात. NCERT च्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना यासंदर्भात अधिक अपडेट मिळू शकणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EylkE9

Comments
Post a Comment