म. टा. वृत्तसेवा, ठाणे करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अन् नव्याने ओमायक्रॉन () विषाणूच्या फैलावामुळे पालकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. यामुळे अजूनही ठाणे शहरासह ग्रामीण परिसरातील पालकांनी शाळांना संमती पत्र (consent letter of parents) दिलेले नाही. अनेक ठिकाणी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे शाळा सुरू झाल्या नसल्याची परिस्थिती होती. ठाणे जिल्ह्यातील पहिली ते सातवीच्या ४ हजार ५९३ शाळांपैकी १ हजार ७४१ शाळा बुधवार पासून सुरू झाल्या आहेत. यामध्ये ठाणे, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागातील खासगी तसेच सरकारी शाळांचाही समावेश आहे. करोनामुळे गेल्या दीड वर्षांमध्ये शैक्षणिक क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले असून दिवाळीनंतर सरकारने टप्प्याटप्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात ग्रामीण परिसरातील ज्या गावात करोनाचा एकही रुग्ण गेल्या २८ दिवसांमध्ये आढळला नाही, अशा करोनामुक्त परिसरात ठरावाद्वारे शाळा सुरू करण्यात आल्या. कारण ग्रामीण परिसरात ऑनलाइन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना प्रचंड अचडणींना सामोरे जावे लागले. त्यानंतर शहरी भागात आठवी ते बारावी तर, ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आले होते. १ डिसेंबरपासून प्राथमिकचे वर्ग करण्याचा निर्णय झाला पण करोनामुळे अखेर १५ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाले. बुधवारी दीड वर्षांनी शाळेची पहिली घंटा वाजली. शहरी भागात पहिली ते सातवी आणि ग्रामीण भागात पहिली ते चौथीचे वर्ग बुधवारपासून सुरू करण्यात आले. जिल्ह्यात ठाणे, अंबरनाथ, बदलापूर या शहरांसह ग्रामीण भागातील शाळांनी पहिला दिवस अविस्मरणीय केल्याचे चित्र एकीकडे असताना मात्र दुसरीकडे शाळा सुरू झाल्या तरी वर्ग रिकामेच दिसून आले. ठाणे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात पहिली ते सातवीच्या एकूण ४ हजार ५९३ शाळा आहेत. त्यापैकी १ हजार ७४१ शाळा बुधवार पासून सुरू झाल्या आहेत. यामध्ये ठाणे, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागातील खासगी तसेच सरकारी शाळांचा समावेश आहे. ठाणे, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागात पहिली ते सातवीच्या वर्गाच्या खासगी तसेच सरकारी अशा एकूण २ हजार ३२५ शाळा आहेत. त्यापैकी १५०० ते २ हजार शाळा सुरू झाल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. कल्याण-डोंबिवलीत करोना नियमांचे पालन २५ टक्के उपस्थितीत शहरात बुधवारपासून शाळा सुरू झाल्या. शाळा दोन सत्रांमध्ये भरणर असून एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फुटांचे अंतर, वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी असतील. सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर या नियमांचे पालन करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ४८ तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी केलेले असणे आवश्यक आहे. शाळांनी मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे समंतीपत्र मागितले असून पालकांनातिसऱ्या लाटेची चिंता वाटत असल्याने फारसे विद्यार्थी शाळांमध्ये दिसत नाहीत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33DwQBn

Comments
Post a Comment