सुचित्रा सुर्वे, ग्रोथ सेंटर वेदांगला दहावीत ९७.५% टक्के मार्क मिळून उत्तीर्ण झाल्याचा आनंद साजरा करायचा सोडून, पुढच्या परीक्षेची तयारी सुरू करावी लागत आहे. म्हणून तो थोडा हिरमुसलेला आहे. अशी परिस्थिती अनेकांची आहे. बोर्डाची परीक्षा नसल्याचा आनंद होताच. पण आता अकरावी प्रवेशासाठी राज्यभरात सामान्य प्रवेश परीक्षा (सीईटी) द्यावी लागणार, ह्या विचाराने ते नाराज झाले आहेत. मनासारखे मार्क मिळूनदेखील प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे याचा ताण आणि त्रास अनेक विद्यार्थ्यांना होत आहे. आणि परीक्षा म्हटले की तयारी ही लागणारच. जे वेगळ्या बोर्डातले आहेत, त्यांना एसएससी बोर्डचा अभ्यासदेखील करावा लागणार आहे, हा त्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दहावीचा ताण पूर्णपणे संपलेला, उत्तीर्ण झाल्याचा आनंद, आवडत्या कोर्ससाठी प्रवेश, कॉलेजला जाण्याचा उत्साह ह्या सगळ्यामध्ये प्रतीक्षेची तयारी करणं अवघड जाऊ शकते. सीईटीचा सामना करण्यासाठी आपल्यास मदत करण्यासाठी येथे काही टिप्स देत आहे. * अभ्यासाचे फक्त चार विषय आहेत - गणित, विज्ञान, समाजशास्त्र, इंग्रजी - हे जाणून घ्या आणि तशी तयारी सुरू करा. * (वेगळ्या बोर्डाच