Skip to main content

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

महाविकासआघाडी सरकारने २ वर्षात काय केलं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडी सरकारला आज (२७ नोव्हेंबर) २ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भावना व्यक्त केलीय. यात त्यांनी राज्यातील विकास कामांची यादीच वाचून दाखवली आहे. तसेच राज्यातील जनतेनं आपलं मानून सरकारला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद मानलेत. कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “कुठल्याही सरकारची कामगिरी केवळ एका व्यक्तीवर अवलंबून नसते. एक चांगला संघ असेल तर कर्णधाराला बळ मिळतं आणि या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून ही ताकद मला माझे सहकारी, प्रशासन, सर्वसामान्य जनता यांच्याकडून वेळोवेळी मिळाली. आम्ही महाविकास आघाडी म्हणून गेल्या दोन वर्षांच्या काळात जे काम केलं त्यामुळं राज्याची कामगिरी विविध संकटे येऊनही चांगली राहिली आणि याचं श्रेय माझे सहकारी, प्रशासनातील सर्व अधिकारी- कर्मचारी यांचं आहे. राज्यातल्या जनतेनंसुद्धा आम्हाला आपलं मानलं; ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मी समजतो.”

“२० हजार कोटींपेक्षा जास्त कर्जमाफी करून दाखवली”

“सत्तेवर आल्यानंतर चार  महिन्यांतच करोनाच्या मोठय़ा आव्हानाला सामोरं जावं लागलं हे आपल्याला माहीतच आहे; पण तत्पूर्वी आम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मानेवरचं कर्जाचं ओझं काही प्रमाणात का होईना उतरवणारी ‘महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ आणली आणि २० हजार कोटींपेक्षा जास्त कर्जमाफी करून दाखवली. मी हे एवढय़ाचसाठी सांगितलं कारण अगदी सत्तेवर आल्यापासून आमचा केंद्रिबदू सर्वसामान्य लोक, शेतकरी, कामगार होता आणि पुढेही राहील,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“संकटाचं संधीत रूपांतर केलं”

“अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती आल्या, पण आम्ही विचलित झालो नाही. बहुतांश कालावधी तर करोनाचा मुकाबला करण्यात गेला आणि आजही या विषाणूने आपलं रूप बदलवून परत एकदा जगासमोर आव्हान उभं केलं आहे. पण पहिल्या दोन्ही लाटांमध्ये आम्ही अतिशय नियोजनबद्ध पावलं टाकली, जसं की देशात पहिल्यांदाच तज्ज्ञ डॉक्टर्सचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय टास्क फोर्स निर्माण केले. लहान मुलांमधील संसर्गाची भीती लक्षात घेऊन बालकांसाठी वेगळा टास्क फोर्स उभा केला. ही काही उदाहरणं आहेत. पण एकूणच आरोग्य क्षेत्रातील सर्व संबंधित तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेत आपण पुढे जात राहिलो. संकटाचं संधीत रूपांतर केलं,” असंही मुख्यमंत्री ठाकरेंनी नमूद केलं.

“मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा वाढविल्या”

उद्धव ठाकरे म्हणाले, “आज तुलना केली तर, दोन वर्षांपूर्वीची आरोग्य आणि वैद्यकीय यंत्रणा तसेच साधनसुविधा आणि आत्ताच्या सुविधा यात मोठा फरक आहे. करोनाच्या या लढय़ात आपण या सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढविल्या आहेतच; शिवाय त्या कायमस्वरूपी झाल्या आहेत, त्यामुळे भविष्यातदेखील विविध रोग आणि साथींचा मुकाबला आपण सक्षमपणे करू शकणार आहोत. प्राणवायू निर्मिती असो, मोठय़ा प्रमाणावर लसीकरण असो, मोठमोठय़ा जम्बो सेंटर्सची उभारणी किंवा यात तंत्रज्ञानाच्या मदतीने काही नावीन्यपूर्णता आणणं असो, राज्यानं देशात निश्चितपणे उदाहरण निर्माण केलं असा मला विश्वास आहे.”

“नवनवीन योजना नुसत्या आणल्याच नाहीत तर राबवून दाखवल्या”

“मुख्य म्हणजे हे सर्व सुरू असताना शासन आणि प्रशासनात कुठेही नकारात्मकता नव्हती. उद्योग-गुंतवणूक, शेती, पायाभूत सुविधा, सर्वसामान्यांसाठी घरं, रोजगार, पाणीपुरवठा, सौर ऊर्जा, पर्यावरण, पर्यटन याकडे लक्ष होतं. प्रत्येक विभागाने या संपूर्ण काळात सर्वसामान्यांना प्रत्यक्ष लाभ कसा मिळेल यासाठी भरपूर मेहनत घेतली. नवनवीन योजना नुसत्या आणल्याच नाहीत तर राबवून दाखवल्या,” असंही त्यांनी सांगितलं.

“रोजगाराच्या संधी निर्माण करताना सुविधाही वाढवून दिल्या”

“इलेक्ट्रिक वाहन धोरणाचं उदाहरण निश्चितपणे द्यायला आवडेल. हे पर्यावरणपूरक आणि प्रगतिशील धोरण आणून महाराष्ट्रानं वाहन उद्योग असो किंवा वाहनं वापरणारे नागरिक असो यांच्यामध्ये एक नवा विश्वास जागविला. या संकटकाळात पर्यटन व्यवसायात महाराष्ट्रानं जितक्या विविध कल्पना आणल्या असतील तितक्या क्वचितच इतर राज्यांनी आणल्या असतील. एकीकडं रोजगाराच्या संधी निर्माण केल्या तर दुसरीकडे सुविधा वाढवून या क्षेत्रातील लोकांना प्रोत्साहन दिलं,” असंही त्यांनी नमूद केलं.

“गेल्या वर्षी सुमारे दोन लाख तरुणांना रोजगार दिला”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “पर्यटनास उद्योगाचा दर्जा दिला, परवान्यांची अनावश्यक संख्या कमी केली. करोना असूनही विविध उपक्रम राबवून गेल्या वर्षी सुमारे दोन लाख तरुणांना रोजगार दिला. तरुणांना वेगवेगळय़ा कौशल्यांत पारंगत करून त्यांना रोजगार मिळेल असं पाहिलं. हिंदूुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गही आम्ही लवकरच खुला करणार आहोत. राज्यात विविध शहरांना हवाई सेवेनं जोडण्याचे नियोजन आहे. रस्ते, मेट्रो मार्ग यांचं इतकं भक्कम आणि दर्जेदार जाळं राज्यात असणार आहे की गतिमान महाराष्ट्राची नवीन ओळख त्यातून निर्माण होईल.”

हेही वाचा : महाआघाडी’ ची दोन वर्षे : जनतेनं आम्हाला आपलं मानलं..

“देशाचं ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईसारख्या महानगरात सागरी मार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर िलक आणि इतर मार्ग यामुळे मुंबई, ठाणे तसेच संपूर्ण महानगराच्या दळणवळण इतिहासात क्रांती आल्याशिवाय राहणार नाही. हे सर्व करताना वनांचा विकास, वन्यजीवांना संरक्षण, समृद्ध पर्यावरणाचा विचार यांच्याशी कुठंही तडजोड केली नाही. वन्यजीवांचादेखील विचार केला, त्यांच्या भ्रमण आणि अधिवासासाठी ११ नवीन राखीव संवर्धन क्षेत्रं केली आहेत,” असं ठाकरे म्हणाले.

The post महाविकासआघाडी सरकारने २ वर्षात काय केलं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले… appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/317EiDU

Comments

Popular posts from this blog

BPNL Recruitment 2022: पशुसंवर्धन विभागात दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी

BPNL : भारताच्या पशुपालन निगम लिमिटेडमध्ये (Animal Husbandry Corporation of India Limited, BPNL) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. पशुपालन निगम लिमिटेडमध्ये ट्रेनिंग कंट्रोल ऑफिसर (Training Control Officer), ट्रेनिंग कंट्रोल इंचार्ज (Training Control Incharge),ट्रेनिंग कोऑर्डिनेटर (Training Coordinator), ट्रेनिंग असिस्टंटची (Training Assistant) अनेक पदे भरली जाणार आहेत. बीपीएनएल भरती २०२२ () साठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आली आहे. बीपीएनएल भरती २०२२ अंतर्गत एकूण ७८७५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पशुपालन निगम लिमिटेड ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या भरतीच्या जाहिरातीनुसार, २१ ते ४५ वर्षे वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. रिक्त जागांचा तपशील ट्रेनिंग कंट्रोल ऑफिसरच्या ७५ रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठ...

UPSC ESE पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या तपशील

ESE pre-exam 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा परीक्षा (ESE) २०२२ ची तारीख जाहीर केली आहे. आयोगातर्फे अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर तारीख जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेची तयारी करणारे उमेदवार वेबसाइटवर वेळापत्रक तपासू आणि डाउनलोड करू शकतात. यूपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ईएसई पूर्व परीक्षा २० फेब्रुवारी २०२२ रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येतील. सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत ही परीक्षा होईल. परीक्षा सुरु होण्यापुर्वी १५ दिवसांच्या आत उमेदवारांना यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा प्रवेशपत्र २०२२ डाउनलोड करता येईल. सर्व उमेदवारांना अधिकृत वेबसाइट तपासत राहण्याचा सल्ला दिला जातो. मुख्य परीक्षेची तारीख पूर्व परीक्षेनंतर जाहीर केली जाईल. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेस बसण्यास पात्र असतील. इंजिनीअरिंग सेवा (प्राथमिक/फेज-I) परीक्षेत दोन वस्तुनिष्ठ प्रकारच्या (multiple choice) प्रश्नपत्रिका असतील. ही परीक्षा जास्तीत जास्त ५०० गुणांची असेल. (पेपर १ - २०० गुण आणि पेपर २- ३०० गुण). यूपीएससीतर्फे प्र...

पांढरे विष- साखर - एकदा हा लेख आवर्जून वाचा

साखर ही उसाच्या रसावर रासायनिक प्रक्रिया करून बनविली जाते. प्रोटीन्स व खजिन द्रव्यांचा अभाव साखर ही उसाच्या रसावर रासायनिक प्रक्रिया करून बनविली जाते. प्रोटीन्स व खजिन द्रव्यांचा अभाव असूनही चवीने मधुर व दिसायला पांढरीशुभ्र असणारी साखर लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वानाच आवडते. आधुनिक काळात , तर प्रत्येक तयार पदार्थात साखरेचाच समावेश केलेला असतो. जाम , बिस्किट्स , चॉकलेटस् , केक , मिठाई अशा अनेक पदार्थात साखरेचा सढळपणे वापर केला जातो. साखर बनविण्याची प्रक्रिया   उसाचा रस हा पचनास अतिशय हलका असतो. या रसाला अटविले जाते व त्यात चुना घालून उकळल्याने त्यातील मळ काढून टाकता जातो. नंतर सतत आटवीत राहिल्यामुळे व अनेक रसायनिक पदार्थाचा वापर केल्यामुळे हाच उसाचा घट्ट रस पचण्यास कठीण होतो. सल्फर डायऑक्साईड वायू , फॉर्मालीन , रिफायिनग व ब्लिचिंग या सर्व रासायनिक प्रक्रियांतून घट्ट रस आटविला जाऊन , पांढरीशुभ्र दाणेदार साखर बनवली जाते. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर साखर एक शुद्ध रासायनिक पदार्थ बनतो व अशी ही साखर वर्षांनुवर्षे टिकते. ती कधीही खराब होत नाही. कारण , रासायनिक...

गिलोय एक संजीवनी - गिलोय से होने वाले शारीरिक फायदे

Harbayu wellness care Dr.Ravindra Nandedkar गिलोय चूर्ण गिलोय/गुळवेल ज्यूस      राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त डॉ.रविंद्र नांदेडकर द्वारा संशोधित की गयी Diaba-T मैं इस्तेमाल की गई गिलोय/गूलेठी/गुलवेल के नाम भी जाना जाता है। आइये हम गिलोय से होने वाले शारीरिक फायदे की ओर देखें :-      गिलोय एक प्रकार की लता/बेल है, जिसके पत्ते पान के पत्ते की तरह होते है। यह इतनी अधिक गुणकारी होती है, कि इसका नाम अमृता रखा गया है। आयुर्वेद में गिलोय को बुखार की एक महान औषधि के रूप में माना गया है। गिलोय का रस पीने से शरीर में पाए जाने वाली विभिन्न प्रकार की बीमारियाँ दूर होने लगती हैं। गिलोय की पत्तियों में कैल्शियम, प्रोटीन तथा फास्फोरस पाए जाते है। यह वात, कफ और पित्त नाशक होती है। यह हमारे शरीर की रोगप्रतिरोधक शक्ति को बढाने में सहायता करती है। इसमें विभिन्न प्रकार के महत्वपूर्ण एंटीबायोटिक तथा एंटीवायरल तत्व पाए जाते है जिनसे शारीरिक स्वास्थ्य को लाभ पहुँचता है। गिलोय में प्राकृतिक रूप से शरीर के दोषों को संतुलित करने की क्षमता पाई जाती है।      गिलोय एक बहुत...

मधुमेह पुर्ण बरा होतो का?

मधुमेह पुर्ण बरा होतो का? हो मधुमेह हा आजार नाही तर आपल्या शरीर यंत्रणेतील बिघाड आहे आणि इतर अनेक आजारांचं प्रवेशद्वार आहे आज भारतातील प्रत्येकी तीन व्यक्तीमागे एकास मधुमेह आहे किंवा पुढच्या आयुष्यात कधी तरी होणार आहे. आज हीच गोष्ट कितीतरी मधुमेह तज्ञ व औषधं बनविणाऱ्या उद्योगांसाठी हवी हवीशी वाटत असली तरीही रुग्णांसाठी फारच धोकादायक आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ९०%(नव्वद टक्के)रुग्ण याबद्दल जागरूक नाहीत. काहींना तर हा विषयच नकोसा वाटतो. परिणामी पुढे जाऊन आपल्या पदरात काय वाढून ठेवले आहे, ह्याची जरासुद्धा खबरबात ते घेत नाहीत. काही रुग्ण तर फक्त "माझी तज्ञ डॉक्टरांकडे ट्रिटमेंट सुरू आहे आता माझी शुगर नॉर्मल आहे मी फक्त  त्यांचाच सल्ला घेतो आहे" असे म्हणून सर्व जबाबदारी त्यांच्या डॉक्टरांवरच टाकत असतात. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही कि गोळी सुरू आहे म्हणून कंट्रोल आहे नॉर्मल नाही आणि जरी गोळी सुरू असली तरी त्यांच्या शरीरात झालेला बिघाड हा वाढतच असतो, पण मधुमेह असलेल्या व्यक्तीला याची काहीही कल्पना नसते. मधुमेह हा खालील आजारांना आमंत्रण देतो १)उच्च र...

Regal Assets

Our Company Regal Assets was founded by young entrepreneur and investor Tyler Gallagher. The company started its operations with a small investment and a big vision: to simplify, innovate and rejuvenate the alternative assets investment landscape which was still operating under heavy bureaucracy and unnecessary hurdles. 10 years later, with zero additional startup capital and a lot of persistence, Regal Assets is the highest rated alternative assets firm in the country, with recognition from the likes of  Forbes, Smart Money, the Huffington Post  and many others. The company was also ranked #20 in the U.S. by the famous  INC 500  in the financial services category, and subsequently featured on the prestigious Reuters Sign on Times Square to congratulate them on their victory. Mission Regal Assets aims to be every investor’s one stop shop when it comes to metals and cryptos investing. The company however specializes in helping individual investors add me...