Swami Vivekananda birth anniversary: दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती ही राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून तरुणांना समर्पित करण्यात येतो. भारताला तरुणांचा देश म्हटले जाते. हे तरुणांसाठी नेहमीच प्रेरणास्थान राहिले आहेत. ते भारतीय तत्त्वज्ञ आणि सुधारक होते. ते धार्मिक सहिष्णुतेचा उपदेश करण्यासाठी आणि भारतीय अध्यात्माला पाश्चात्य भौतिक प्रगतीशी जोडण्यासाठी देखील ओळखले जात होते. १९८४ मध्ये, भारत सरकारने १२ जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. यामागे महत्वाचे कारण आहे. तते म्हणजे, तरुणांच्या शाश्वत उर्जेला जागृत करण्याचा आणि प्रेरित करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे, परिणामी संपूर्ण देशाची समृद्धी होईल असा देशाला विश्वास आहे. स्वामी विवेकानंदांना प्रत्येक मुलामध्ये देशासाठी आशेचा किरण दिसला. कारण मुले आणि तरुण 'लोखंडी स्नायू' आणि 'पोलादी नसां'द्वारे सामाजिक बदल घडवून आणू शकतात असा त्यांचा विश्वास होता. वयाच्या २५ व्या वर्षी बनले संन्यासी स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. स्वामीजींचे वडील कोलकाता उच्च न्यायालयात वकील होते. त्यांचे आजोबा दुर्गाचरण दत्त हे संस्कृत आणि पर्शियन भाषांचे विद्वान होते आणि वयाच्या २५ व्या वर्षी संन्यासी झाले. नरेंद्रनाथ दत्त यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती. आपल्या जीवनात प्रत्येक प्रकारे परिपूर्ण असूनही, वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी संसारिक आसक्तीचा त्याग केला आणि आपल्या गुरूंच्या प्रभावाखाली ते संन्यासी झाले. यानंतर त्यांचे नाव बदलून विवेकानंद ठेवण्यात आले. त्यांनी परदेशात भारताचे नाव रोशन केले, त्यांची भाषणे आजही लोकांच्या स्मरणात आहेत. देश-विदेशात भटकंती करून त्यांनी संपूर्ण जगात भारताचे नाव रोशन केले. देशातील अनेक राज्यांमध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात अनेक सरकारी संस्था पुढाकार घेऊन कार्यक्रम आखतात. राष्ट्रीय युवा महोत्सव हा १२ जानेवारीचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. जिथे देशभरातील लोक एकत्र येतात आणि त्यांच्यात एकता आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. यंदा हा महोत्सव पॉंडेचरीमध्ये १२ ते १६ जानेवारी या पाच दिवसांच्या कालावधीत होणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन चार टप्प्यांत करण्यात आले आहे. यामध्ये युवा शिखर परिषद, देशी क्रीडा जागृती, योग आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश आहे. २५ व्या राष्ट्रीय युवा दिनाच्या पाच दिवसीय महोत्सवाचे पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सभेला ते संबोधित करणार आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33wjy9S

Comments
Post a Comment