म. टा. प्रतिनिधी, पुणे शाळेच्या काळात विद्यार्थ्यांना कधीतरी विद्यार्थ्यांना एखादा तास 'ऑफ' मिळतो; पण गेल्या दोन वर्षांमध्ये असे हजारो तास ऑफ झाल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांच्या तासिका किती असाव्यात, याबद्दल घालून दिलेले नियमांना तिलांजली मिळाली असून, विद्यार्थ्यांचे दीड हजारांहून अधिक तास रद्द झाल्याचे समोर आले आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने विद्यार्थ्यांवर ही वेळ आली असून यामुळे अभ्यासक्रम २० टक्केही पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. करोनाचा प्रादुर्भाव, ऑनलाइन शिक्षणाची अनास्था आणि कंटाळवाणे झालेले शिक्षण अशा कारणांमुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे शिक्षणतज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. राज्यात मार्च २०२० पासून शाळा बंद करण्यात आल्या. तेव्हापासून संपूर्ण राज्यात सलग एक महिनाही शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. ग्रामीण भागातील काही प्राथमिक शाळा आणि शहरातील आठवी ते बारावीचे ऑफलाइन होणारे वर्ग सोडले तर राज्यातील मुलांचे संपूर्ण शिक्षण ऑनलाइन पद्धतीने झाले आहे. या शिक्षणामुळे आरटीईने तासिकांबद्दल घालून दिलेल्या नियमांची पायामल्ली केली जात आहे. आरटीई कायद्यातील तरतुदीनुसार पहिली ते पाचवी या वर्गांसाठी वर्षभरात २०० दिवस शाळा सुरू राहणे आवश्यक आहे, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी २२० दिवसांचा आहे. या कालावधीत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे ८०० तास, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे एक हजार तास भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे तास भरले तरच विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो; पण गेल्या दोन वर्षांचा ऑनलाइन शिक्षणाचा कालावधी लक्षात घेतला तर वर्षभरात विद्यार्थ्यांचे केवळ १०० ते २०० तास पूर्ण झाल्याचे दिसून आले आहे. एक ते दीड तास चालणाऱ्या ऑनलाइन वर्गांमुळे विद्यार्थ्यांच्या तासिकाच पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. याशिवाय आरटीई कायद्यामध्ये जे विद्यार्थी अप्रगत आहेत. त्यांना अतिरिक्त एक तास शिकवण्याची तरतूद करण्यात आली आहे. नेहमीच्याच विद्यार्थ्यांना शिकवणे होत नसताना शिक्षक अतिरीक्त तास कधी घेणार, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. तासिकांबाबत आरटीईचे नियम पहिली ते पाचवीसाठी शाळेचे किमान दिवस : २०० दिवस सहावी ते आठवीसाठी शाळेचे किमान दिवस : २२० दिवस पहिली ते पाचवीसाठी शाळेच्या किमान तासिका : ८०० (एका वर्षासाठी) सहावी ते आठवीसाठी शाळेच्या किमान तासिका : १००० (एका वर्षासाठी) सद्य:स्थिती ग्रामीण भागातील शाळांचे किमान दिवस : ९० ते १०० शहरी भागातील शाळांचे किमान दिवस : ७० ते ८० ग्रामीण भागात झालेल्या तासिका : २०० ते २५० शहरी भागात झालेल्या तासिका : १५० ते २०० म्हणून शाळा सुरू करण्याचा आग्रह गेल्या दोन वर्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या शाळांमधील तासिकाच पूर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम २० टक्केही शिकवून झालेला नाही. विज्ञान, गणित अशा प्रत्यक्ष शिकवल्या जाणाऱ्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांची कोणतीही या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राज्यातील शाळा बंद करणे इथून पुढे परवडणारे नाही, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rnVeiq
Comments
Post a Comment