CBSE Marks Policy for Board Exam 2022: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (Central Board of Secondary Education, CBSE) बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सीबीएसई विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाने () मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार सीबीएसईचे गुण धोरण (Marking Policy) बाजूला ठेवले आहे. यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे सर्वोत्तम गुण निवडण्याचा पर्याय असेल. न्यायालयाचा हा निर्णय सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्डाच्या दोन्ही परीक्षांना (CBSE Board Exam) लागू असेल. सुप्रीम कोर्टाने सीबीएसईचा नियम बाजूला ठेवला असून त्यानुसार सुधार परीक्षेत मिळालेले गुण अंतिम मानले जाणार आहेत. 'मुख्य परीक्षा आणि सुधारणा परीक्षा या दोन्हीमध्ये कोणाचे गुण घ्यायचे? हा निर्णय विद्यार्थ्यांचा असेल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती एएम खानविलकर आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. सीबीएसईने सुधार परीक्षेत मिळालेले गुण अंतिम मानण्याच्या धोरणामागे कोणतेही तर्क दिलेले नाहीत असे यावेळी खंडपीठाने म्हटले. विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेत मिळालेले मूळ गुण टिकवून ठेवायचे आहेत. सीबीएसई इम्प्रूव्हमेंट परीक्षा दिल्यानंतर जर गुण कमी पडले आणि ते अंतिम मानले गेले, तर त्याचा त्यांच्या प्रवेशावर परिणाम होईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. विद्यार्थ्याला जे गुण योग्य असतील ते मान्य करायला काय हरकत आहे? मंडळाने यापूर्वीही असेच केले आहे, आता तोच नियम लागू करण्यात गैर काय? हे का शक्य नाही याचे कारण सांगा? असे न्यायमूर्ती खानविलकर यांनी सीबीएसईला विचारले. सीबीएसईने नियम बदलण्यासाठी कोणताही वैध युक्तिवाद दिलेला नाही. विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच दोनपैकी सर्वोत्तम गुण निवडण्याचा पर्याय देईल. मुख्य परीक्षेचे गुण अंतिम निकालात ठेवायचे की सुधारित परीक्षेत हे विद्यार्थ्यांवर अवलंबून असेल असे न्यायालयाने याचिका फेटाळताना सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HF8Ex6

Comments
Post a Comment