Skip to main content

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

शाळा सुरू करण्यासाठी संघटना एकवटल्या

‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनामुळे राज्यातील शाळा बंद करून खासगी ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या कंपन्यांना सरकार बळ देत असल्याचा आरोप करीत, राज्यातील स्वयंसेवी संघटना शाळा सुरू करण्यासाठी पुन्हा एकवटल्या आहेत. शिक्षण हक्क मंच, बालहक्क संघटना, बालमजुरीविरोधी अभियान, मैत्री संघटना, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ, राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शाळा सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा सरकारकडे मागणी लावून धरली आहे. राज्यात सध्या करोनाची रुग्णसंख्या वाढत असली, तरी इतर सर्व क्षेत्रांतील व्यवहार पूर्वपदावर आहेत. कोणतेही व्यवहार पूर्णपणे बंद केलेले नाहीत. अशा स्थितीत शाळा मात्र अद्याप बंद करून त्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांत वर्ग व्यवस्थित न भरल्याने ग्रामीण, आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांबरोबरच शहरी भागांतील सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. ऑनलाइन वर्गांच्या नावाखाली शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असून, डिजिटल शिक्षण देणाऱ्या खासगी कंपन्यांच्या नफेखोरीला मोकळे रान मिळाले आहे. त्यामुळे करोनाचा बागुलबुवा न करता शाळा सुरू करा, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षणतज्ज्ञ हेमांगी जोशी यांनी केली आहे. डिजिटल शिक्षणाचे मुलांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम झाले आहेत. चिंतामग्नता, औदासीन्य, निद्रानाश, चंचलपणा तसेच डोळ्यांचे विकार यांसारखे आजार शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहेत. शाळेच्या वयातील मुलांना इतर सर्व ठिकाणी मुक्त प्रवेश असताना, केवळ शाळाच का बंद ठेवल्या गेल्या. लग्न व इतर समारंभांना मर्यादा पाळून समारंभ करण्याची अट आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांनाही ही अट लागू करून शाळा सुरू ठेवण्याचा विचार राज्य सरकारने करावा, अशी मागणीही यामध्ये करण्यात आली. राज्य सरकारने शाळा सुरू करण्याबाबत त्वरित निर्णय घेऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनास द्यावेत. शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक पातळीवरील प्रशासनाला दिल्यास शाळा बंद ठेवण्याकडेच प्रशासनाचा कल राहतो, असा अनुभव आहे. त्यामुळे करोना परिस्थितीच्या वास्तवावर आधारित वैज्ञानिक पद्धतीने आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचे निर्णय घेण्याचे अधिकार पालक-शिक्षक, स्थानिक पातळीवरील शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामसभांना द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. वंचितांच्या शिक्षणाला धोका शाळा बंद असल्यामुळे मुलींच्या विवाहापासून अनेक समस्या डोके वर काढत आहेत. वंचित, गरीब घटकातील मुलांना जीवन सुधारण्यासाठी शिक्षण हे एकमेव साधन आहे. शाळा बंद ठेवल्यामुळे राज्यातील बहुसंख्येने असलेल्या सर्वसामान्य आणि गरीब वर्गातील, दलित, आदिवासी, भटके समूह आणि शहरी गरिबांच्या मुलांचे शिक्षण धोक्यात आले आहे. पडलेले प्रश्न - करोना साथीचा प्रसार लहान मुलांमध्ये नगण्य होता. तिसरी लाट आल्या आल्या ताबडतोब शाळा बंद करण्याचा निर्णय का घेतला? - इतर सर्व ठिकाणी मुक्त प्रवेश असताना, केवळ शाळाच का बंद ठेवल्या गेल्या? - स्थानिक पातळीवर शाळा सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेणे सहज शक्य असताना, मुठभर सल्ल्यावर सर्व शाळांवर निर्णय का? - अट टाकून इतर कार्यक्रम सुरू ठेवता मग शाळा अशा सुरू ठेवण्याचा निर्णय का नाही? - इंग्लंड, अमेरिका, युरोपमधील जवळजवळ सर्व देशांनी त्यांच्याकडे आपल्यापेक्षा करोना रुग्णांचे प्रमाण जास्त असूनही शाळा सुरू ठेवल्या आहेत. मग आपल्याकडे का नाही? - मुलांच्या जिवाचा बागुलबुवा उभा करून शाळा का बंद ठेवल्या जात आहेत? - वैद्यकीय पातळीवर एवढी जय्यत तयारी केली असतानाही शाळा बंद का? - लशींच्या परिणामकारकतेवर सरकारचा विश्वास नाही का?


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Kqnw4M

Comments

Popular posts from this blog

BPNL Recruitment 2022: पशुसंवर्धन विभागात दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी

BPNL : भारताच्या पशुपालन निगम लिमिटेडमध्ये (Animal Husbandry Corporation of India Limited, BPNL) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. पशुपालन निगम लिमिटेडमध्ये ट्रेनिंग कंट्रोल ऑफिसर (Training Control Officer), ट्रेनिंग कंट्रोल इंचार्ज (Training Control Incharge),ट्रेनिंग कोऑर्डिनेटर (Training Coordinator), ट्रेनिंग असिस्टंटची (Training Assistant) अनेक पदे भरली जाणार आहेत. बीपीएनएल भरती २०२२ () साठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आली आहे. बीपीएनएल भरती २०२२ अंतर्गत एकूण ७८७५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पशुपालन निगम लिमिटेड ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या भरतीच्या जाहिरातीनुसार, २१ ते ४५ वर्षे वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. रिक्त जागांचा तपशील ट्रेनिंग कंट्रोल ऑफिसरच्या ७५ रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठ

UPSC ESE पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या तपशील

ESE pre-exam 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा परीक्षा (ESE) २०२२ ची तारीख जाहीर केली आहे. आयोगातर्फे अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर तारीख जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेची तयारी करणारे उमेदवार वेबसाइटवर वेळापत्रक तपासू आणि डाउनलोड करू शकतात. यूपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ईएसई पूर्व परीक्षा २० फेब्रुवारी २०२२ रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येतील. सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत ही परीक्षा होईल. परीक्षा सुरु होण्यापुर्वी १५ दिवसांच्या आत उमेदवारांना यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा प्रवेशपत्र २०२२ डाउनलोड करता येईल. सर्व उमेदवारांना अधिकृत वेबसाइट तपासत राहण्याचा सल्ला दिला जातो. मुख्य परीक्षेची तारीख पूर्व परीक्षेनंतर जाहीर केली जाईल. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेस बसण्यास पात्र असतील. इंजिनीअरिंग सेवा (प्राथमिक/फेज-I) परीक्षेत दोन वस्तुनिष्ठ प्रकारच्या (multiple choice) प्रश्नपत्रिका असतील. ही परीक्षा जास्तीत जास्त ५०० गुणांची असेल. (पेपर १ - २०० गुण आणि पेपर २- ३०० गुण). यूपीएससीतर्फे प्र

पांढरे विष- साखर - एकदा हा लेख आवर्जून वाचा

साखर ही उसाच्या रसावर रासायनिक प्रक्रिया करून बनविली जाते. प्रोटीन्स व खजिन द्रव्यांचा अभाव साखर ही उसाच्या रसावर रासायनिक प्रक्रिया करून बनविली जाते. प्रोटीन्स व खजिन द्रव्यांचा अभाव असूनही चवीने मधुर व दिसायला पांढरीशुभ्र असणारी साखर लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वानाच आवडते. आधुनिक काळात , तर प्रत्येक तयार पदार्थात साखरेचाच समावेश केलेला असतो. जाम , बिस्किट्स , चॉकलेटस् , केक , मिठाई अशा अनेक पदार्थात साखरेचा सढळपणे वापर केला जातो. साखर बनविण्याची प्रक्रिया   उसाचा रस हा पचनास अतिशय हलका असतो. या रसाला अटविले जाते व त्यात चुना घालून उकळल्याने त्यातील मळ काढून टाकता जातो. नंतर सतत आटवीत राहिल्यामुळे व अनेक रसायनिक पदार्थाचा वापर केल्यामुळे हाच उसाचा घट्ट रस पचण्यास कठीण होतो. सल्फर डायऑक्साईड वायू , फॉर्मालीन , रिफायिनग व ब्लिचिंग या सर्व रासायनिक प्रक्रियांतून घट्ट रस आटविला जाऊन , पांढरीशुभ्र दाणेदार साखर बनवली जाते. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर साखर एक शुद्ध रासायनिक पदार्थ बनतो व अशी ही साखर वर्षांनुवर्षे टिकते. ती कधीही खराब होत नाही. कारण , रासायनिक विष

गिलोय एक संजीवनी - गिलोय से होने वाले शारीरिक फायदे

Harbayu wellness care Dr.Ravindra Nandedkar गिलोय चूर्ण गिलोय/गुळवेल ज्यूस      राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त डॉ.रविंद्र नांदेडकर द्वारा संशोधित की गयी Diaba-T मैं इस्तेमाल की गई गिलोय/गूलेठी/गुलवेल के नाम भी जाना जाता है। आइये हम गिलोय से होने वाले शारीरिक फायदे की ओर देखें :-      गिलोय एक प्रकार की लता/बेल है, जिसके पत्ते पान के पत्ते की तरह होते है। यह इतनी अधिक गुणकारी होती है, कि इसका नाम अमृता रखा गया है। आयुर्वेद में गिलोय को बुखार की एक महान औषधि के रूप में माना गया है। गिलोय का रस पीने से शरीर में पाए जाने वाली विभिन्न प्रकार की बीमारियाँ दूर होने लगती हैं। गिलोय की पत्तियों में कैल्शियम, प्रोटीन तथा फास्फोरस पाए जाते है। यह वात, कफ और पित्त नाशक होती है। यह हमारे शरीर की रोगप्रतिरोधक शक्ति को बढाने में सहायता करती है। इसमें विभिन्न प्रकार के महत्वपूर्ण एंटीबायोटिक तथा एंटीवायरल तत्व पाए जाते है जिनसे शारीरिक स्वास्थ्य को लाभ पहुँचता है। गिलोय में प्राकृतिक रूप से शरीर के दोषों को संतुलित करने की क्षमता पाई जाती है।      गिलोय एक बहुत ही महत्वपूर्ण आयुर्वेदिक जडीबूटी है। गिलोय

मधुमेह पुर्ण बरा होतो का?

मधुमेह पुर्ण बरा होतो का? हो मधुमेह हा आजार नाही तर आपल्या शरीर यंत्रणेतील बिघाड आहे आणि इतर अनेक आजारांचं प्रवेशद्वार आहे आज भारतातील प्रत्येकी तीन व्यक्तीमागे एकास मधुमेह आहे किंवा पुढच्या आयुष्यात कधी तरी होणार आहे. आज हीच गोष्ट कितीतरी मधुमेह तज्ञ व औषधं बनविणाऱ्या उद्योगांसाठी हवी हवीशी वाटत असली तरीही रुग्णांसाठी फारच धोकादायक आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ९०%(नव्वद टक्के)रुग्ण याबद्दल जागरूक नाहीत. काहींना तर हा विषयच नकोसा वाटतो. परिणामी पुढे जाऊन आपल्या पदरात काय वाढून ठेवले आहे, ह्याची जरासुद्धा खबरबात ते घेत नाहीत. काही रुग्ण तर फक्त "माझी तज्ञ डॉक्टरांकडे ट्रिटमेंट सुरू आहे आता माझी शुगर नॉर्मल आहे मी फक्त  त्यांचाच सल्ला घेतो आहे" असे म्हणून सर्व जबाबदारी त्यांच्या डॉक्टरांवरच टाकत असतात. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही कि गोळी सुरू आहे म्हणून कंट्रोल आहे नॉर्मल नाही आणि जरी गोळी सुरू असली तरी त्यांच्या शरीरात झालेला बिघाड हा वाढतच असतो, पण मधुमेह असलेल्या व्यक्तीला याची काहीही कल्पना नसते. मधुमेह हा खालील आजारांना आमंत्रण देतो १)उच्च र

Regal Assets

Our Company Regal Assets was founded by young entrepreneur and investor Tyler Gallagher. The company started its operations with a small investment and a big vision: to simplify, innovate and rejuvenate the alternative assets investment landscape which was still operating under heavy bureaucracy and unnecessary hurdles. 10 years later, with zero additional startup capital and a lot of persistence, Regal Assets is the highest rated alternative assets firm in the country, with recognition from the likes of  Forbes, Smart Money, the Huffington Post  and many others. The company was also ranked #20 in the U.S. by the famous  INC 500  in the financial services category, and subsequently featured on the prestigious Reuters Sign on Times Square to congratulate them on their victory. Mission Regal Assets aims to be every investor’s one stop shop when it comes to metals and cryptos investing. The company however specializes in helping individual investors add metals and cryptos to thei