औरंगाबाद: एकीकडे राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरीही, स्थानिक प्रशासनाने बंद केलेल्या सुरू करण्याबाबत आणखी कोणताही निर्णय झालेला नाहीये.त्यामुळे शहरातील खासगी कोचिंग क्लासेस चालकांनी आक्रमक भूमिका घेत, गुन्हे दाखल केले तरी चालेल पण क्लासेस सुरूच राहणार अशी भूमिका घेतली आहे. कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेण्यात यावेळी असोसिएशनचे राज्याध्यक्ष पी.एम.वाघ बोलत होते. इतर व्यवसायिकांप्रमाणे खासगी कोचिंग क्लासेसकडे सुद्धा शॉप अॅक्टचा परवाना असून, हा एक व्यवसाय आहे. त्यामुळे इतर व्यवसाय सुरू असताना केवळ कोचिंग क्लासेस बंद ठेवणे म्हणजे अन्यायकारक आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हा अन्याय सहन केला जाणार नाही. राज्यातील २७ जिल्ह्यात नियमांचे पालन करून आम्ही ऑफलाईन पद्धतीने शिक्षण सुरूच ठेवणार आहोत,असा इशारा यावेळी वाघ यांनी दिला आहे. सभा, निवडणुका, मिरवणुका, मॉल, बाजारपेठेतील गर्दीतून फिरताना करोना होत नाही का? असा सवाल राज्य उपाध्यक्ष संदीप म्हस्के यांनी उपस्थित केला. अवघ्या दोन महिन्यावर दहावी, बारावीच्या परीक्षा आहेत, त्यामुळे कोचिंग बंद ठेवता येणार नाही. तर गुन्हे दाखल केले तरी चालेल पण क्लासेस सुरूच राहणार आहे. तसेच क्लासेस ५० टक्के क्षमतेने सुरू राहू द्यावे व मनपाने दबावतंत्र वापरु नये, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने देण्यात आला.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qPdbaw
Comments
Post a Comment