औरंगाबाद: शहरातील दहावी ते बारावी पर्यंतचे वर्ग आजपासून (सोमवार) सुरू करण्यास महानगरपालिका प्रशासनाने परवानगी दिली असताना, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुद्धा पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे परवानगी मागितली आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज होणाऱ्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत टास्क फोर्स निर्णय घेणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे जिल्ह्याचं लक्ष लागले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ४६०२ शाळा, महाविद्यालयांत पहिली ते बारावीचे वर्ग चालवले जातात. त्यापैकी ९७३ शहरात तर ३६२९ शाळा ग्रामीण भागात आहेत. तर ग्रामीण भागात १ हजार हजार ३४७ गावांपैकी १६९ गावांमध्ये सध्या करोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी करोनाचे रुग्ण नाही त्या ठिकाणी शाळा सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार आशा ठिकाणी पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे परवानगी मागितली आहे. त्यानुसार आज होणाऱ्या कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान लसीचा किमान एक डोस घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यासाठी शहरातील मनपा हद्दीतील शाळांत प्रत्यक्ष वर्ग सोमवारपासून भरवण्यासाठी मनपा प्रशासकांनी परवानगी दिली आहे. करोनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी शाळांनी करण्याचे निर्देश आहेत. मात्र पहिली ते नववी वर्गांबाबत पुढील आठ दिवसांची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील शाळा बाबत आज होणाऱ्या टास्क फोर्सच्या बैठकीत त्यावर काय निर्णय घेतला जाणार, याकडे विद्यार्थी, पालक, शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33I9E5a
Comments
Post a Comment