Skip to main content

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

२० टक्क्यांतील घरांवर विकासकांचा डल्ला

|| मंगल हनवते

सदनिकांची परस्पर विक्री होत असल्याची कोकण मंडळाकडे तक्रार

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील म्हाडाच्या हिश्श्यातील घरे कोकण मंडळाला देण्यास खासगी विकासक टाळाटाळ करीत आहेत. इतकेच नव्हे तर काही विकासक ही घरे म्हाडाला देण्याऐवजी त्यांची परस्पर विक्री करीत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत म्हाडाच्या कोकण विभागाकडे लेखी तक्रार करण्यात आली असून या मोठ्या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेने अशा एका प्रकरणात एका खासगी विकासकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर आता कोकण मंडळ सर्व महापालिकांना पत्र पाठवून अशा विकासकांविरोधात कारवाई करण्याची सूचना करणार आहे.

सरकारने सर्वसामान्यांना परवडणारी घरे मिळावी यासाठी २०१३ मध्ये २० टक्के सर्वसमावेशक योजना सुरू के ली. या योजनेनुसार मुंबई वगळता १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पालिका क्षेत्रातील चार हजार चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम असलेल्या गृह प्रकल्पांतील २० टक्के घरे आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक करण्यात आले. या घरांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ती म्हाडाला देणे बंधनकारक असून त्यानंतर या घराची म्हाडामार्फत विक्री केली जाते. या योजनेअंतर्गत नुकतीच कोकण मंडळाला ८१२ घरे मिळाली होती आणि या घरांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला होता. ८१२ घरांसाठी दोन लाख सात हजार अर्ज सादर आले होते. एकूणच या घरांना असलेली अधिक मागणी आणि या योजनेतून मोठ्या संख्येने घरे मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन कोकण मंडळाने ती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू के ल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी दिली. मात्र त्याच वेळी वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्रकल्पांमधील अशी घरे उपलब्ध होत नसल्याचेही समोर आल्याचे त्यांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी ठाण्यातील ‘दर्शन सागर’ नावाच्या विकसकाने आपल्या ‘प्लॅटिनम हेरीटेज’ प्रकल्पातील ३१ घरे कोकण मंडळाला देण्याऐवजी ती परस्पर विकून नियमांचा भंग केल्याची बाब समोर आली. यानंतर ठाणे महापालिकेने या विकासकाविरोधात गुन्हा दाखल केला. या  प्रकारानंतर म्हाडाला जाग आली आणि त्यांनी ठाण्यातील अशा  घरांचा शोध घेऊन ८१२ घरे  ताब्यात घेतली. या घरांची १४ ऑक्टोबरला सोडत काढण्यात आली. कोकण मंडळाला वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईतून मात्र अशी घरे मिळालेली नाहीत.

वसई-विरारमधील २० टक्क्यातील घरे विकासक अधिकाऱ्यांच्या मदतीने लाटत असून हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप विरारमधील तक्रारदार नितीन राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी मुख्य सचिवांपासून कोकण मंडळापर्यंत सर्वांना याबाबत लेखी तक्रार दिली आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली असून राऊत यांच्या तक्रारीची प्रत ‘लोकसत्ता’च्या हाती लागली आहे. कोकण मंडळाकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय पालिका प्रकल्पाला निवासी दाखला देऊ शकत नाही. असे असताना मंडळाला घरे न देता काही प्रकल्पाला निवासी दाखला देण्यात आल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. महाजन यांनी मात्र म्हाडाकडून वसई-विरार पालिकेतील अशा एकाही प्रकल्पासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले. तर या तक्रारीची दखल घेण्यात आली असून या प्रकाराला आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकारी यंत्रणा वा पोलीस  या घोटाळ्याच्या तक्रारीची दखल घेताना दिसत नाही. पालिका आणि म्हाडा एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारून नेत आहेत. गरिबांसाठीची घरे विकासक लाटत असून ते ही घरे इतरांना विकू न बक्कळ पैसे कमावत आहेत. या प्रकाराला चाप बसावा यासाठी आता न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही. लवकरच यासंबंधी जनहित याचिका दाखल करणार आहे. – नितीन राऊत, तक्रारदार, विरार

तक्रारीच्या अनुषंगाने वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई पालिकेला लवकरच पत्र लिहून अशा किती प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली, तसेच कोकण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता निवासी दाखला मिळवून किती विकासकांनी घरे विकली याची यादी द्यावी, अशी मागणी केली आहे. नियमांचा भंग करणाऱ्या विकसकांविरोधात महापालिकांनीही कडक कारवाई करावी अशी सूचनाही या पत्रात करण्यात येणार आहे. – नितीन महाजन, मुख्य अधिकारी, कोकण मंडळ, म्हाडा

The post २० टक्क्यांतील घरांवर विकासकांचा डल्ला appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3nzoNM9

Comments

Popular posts from this blog

BPNL Recruitment 2022: पशुसंवर्धन विभागात दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी

BPNL : भारताच्या पशुपालन निगम लिमिटेडमध्ये (Animal Husbandry Corporation of India Limited, BPNL) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. पशुपालन निगम लिमिटेडमध्ये ट्रेनिंग कंट्रोल ऑफिसर (Training Control Officer), ट्रेनिंग कंट्रोल इंचार्ज (Training Control Incharge),ट्रेनिंग कोऑर्डिनेटर (Training Coordinator), ट्रेनिंग असिस्टंटची (Training Assistant) अनेक पदे भरली जाणार आहेत. बीपीएनएल भरती २०२२ () साठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आली आहे. बीपीएनएल भरती २०२२ अंतर्गत एकूण ७८७५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पशुपालन निगम लिमिटेड ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या भरतीच्या जाहिरातीनुसार, २१ ते ४५ वर्षे वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. रिक्त जागांचा तपशील ट्रेनिंग कंट्रोल ऑफिसरच्या ७५ रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठ...

UPSC ESE पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या तपशील

ESE pre-exam 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा परीक्षा (ESE) २०२२ ची तारीख जाहीर केली आहे. आयोगातर्फे अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर तारीख जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेची तयारी करणारे उमेदवार वेबसाइटवर वेळापत्रक तपासू आणि डाउनलोड करू शकतात. यूपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ईएसई पूर्व परीक्षा २० फेब्रुवारी २०२२ रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येतील. सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत ही परीक्षा होईल. परीक्षा सुरु होण्यापुर्वी १५ दिवसांच्या आत उमेदवारांना यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा प्रवेशपत्र २०२२ डाउनलोड करता येईल. सर्व उमेदवारांना अधिकृत वेबसाइट तपासत राहण्याचा सल्ला दिला जातो. मुख्य परीक्षेची तारीख पूर्व परीक्षेनंतर जाहीर केली जाईल. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेस बसण्यास पात्र असतील. इंजिनीअरिंग सेवा (प्राथमिक/फेज-I) परीक्षेत दोन वस्तुनिष्ठ प्रकारच्या (multiple choice) प्रश्नपत्रिका असतील. ही परीक्षा जास्तीत जास्त ५०० गुणांची असेल. (पेपर १ - २०० गुण आणि पेपर २- ३०० गुण). यूपीएससीतर्फे प्र...

पांढरे विष- साखर - एकदा हा लेख आवर्जून वाचा

साखर ही उसाच्या रसावर रासायनिक प्रक्रिया करून बनविली जाते. प्रोटीन्स व खजिन द्रव्यांचा अभाव साखर ही उसाच्या रसावर रासायनिक प्रक्रिया करून बनविली जाते. प्रोटीन्स व खजिन द्रव्यांचा अभाव असूनही चवीने मधुर व दिसायला पांढरीशुभ्र असणारी साखर लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वानाच आवडते. आधुनिक काळात , तर प्रत्येक तयार पदार्थात साखरेचाच समावेश केलेला असतो. जाम , बिस्किट्स , चॉकलेटस् , केक , मिठाई अशा अनेक पदार्थात साखरेचा सढळपणे वापर केला जातो. साखर बनविण्याची प्रक्रिया   उसाचा रस हा पचनास अतिशय हलका असतो. या रसाला अटविले जाते व त्यात चुना घालून उकळल्याने त्यातील मळ काढून टाकता जातो. नंतर सतत आटवीत राहिल्यामुळे व अनेक रसायनिक पदार्थाचा वापर केल्यामुळे हाच उसाचा घट्ट रस पचण्यास कठीण होतो. सल्फर डायऑक्साईड वायू , फॉर्मालीन , रिफायिनग व ब्लिचिंग या सर्व रासायनिक प्रक्रियांतून घट्ट रस आटविला जाऊन , पांढरीशुभ्र दाणेदार साखर बनवली जाते. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर साखर एक शुद्ध रासायनिक पदार्थ बनतो व अशी ही साखर वर्षांनुवर्षे टिकते. ती कधीही खराब होत नाही. कारण , रासायनिक...

गिलोय एक संजीवनी - गिलोय से होने वाले शारीरिक फायदे

Harbayu wellness care Dr.Ravindra Nandedkar गिलोय चूर्ण गिलोय/गुळवेल ज्यूस      राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त डॉ.रविंद्र नांदेडकर द्वारा संशोधित की गयी Diaba-T मैं इस्तेमाल की गई गिलोय/गूलेठी/गुलवेल के नाम भी जाना जाता है। आइये हम गिलोय से होने वाले शारीरिक फायदे की ओर देखें :-      गिलोय एक प्रकार की लता/बेल है, जिसके पत्ते पान के पत्ते की तरह होते है। यह इतनी अधिक गुणकारी होती है, कि इसका नाम अमृता रखा गया है। आयुर्वेद में गिलोय को बुखार की एक महान औषधि के रूप में माना गया है। गिलोय का रस पीने से शरीर में पाए जाने वाली विभिन्न प्रकार की बीमारियाँ दूर होने लगती हैं। गिलोय की पत्तियों में कैल्शियम, प्रोटीन तथा फास्फोरस पाए जाते है। यह वात, कफ और पित्त नाशक होती है। यह हमारे शरीर की रोगप्रतिरोधक शक्ति को बढाने में सहायता करती है। इसमें विभिन्न प्रकार के महत्वपूर्ण एंटीबायोटिक तथा एंटीवायरल तत्व पाए जाते है जिनसे शारीरिक स्वास्थ्य को लाभ पहुँचता है। गिलोय में प्राकृतिक रूप से शरीर के दोषों को संतुलित करने की क्षमता पाई जाती है।      गिलोय एक बहुत...

मधुमेह पुर्ण बरा होतो का?

मधुमेह पुर्ण बरा होतो का? हो मधुमेह हा आजार नाही तर आपल्या शरीर यंत्रणेतील बिघाड आहे आणि इतर अनेक आजारांचं प्रवेशद्वार आहे आज भारतातील प्रत्येकी तीन व्यक्तीमागे एकास मधुमेह आहे किंवा पुढच्या आयुष्यात कधी तरी होणार आहे. आज हीच गोष्ट कितीतरी मधुमेह तज्ञ व औषधं बनविणाऱ्या उद्योगांसाठी हवी हवीशी वाटत असली तरीही रुग्णांसाठी फारच धोकादायक आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ९०%(नव्वद टक्के)रुग्ण याबद्दल जागरूक नाहीत. काहींना तर हा विषयच नकोसा वाटतो. परिणामी पुढे जाऊन आपल्या पदरात काय वाढून ठेवले आहे, ह्याची जरासुद्धा खबरबात ते घेत नाहीत. काही रुग्ण तर फक्त "माझी तज्ञ डॉक्टरांकडे ट्रिटमेंट सुरू आहे आता माझी शुगर नॉर्मल आहे मी फक्त  त्यांचाच सल्ला घेतो आहे" असे म्हणून सर्व जबाबदारी त्यांच्या डॉक्टरांवरच टाकत असतात. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही कि गोळी सुरू आहे म्हणून कंट्रोल आहे नॉर्मल नाही आणि जरी गोळी सुरू असली तरी त्यांच्या शरीरात झालेला बिघाड हा वाढतच असतो, पण मधुमेह असलेल्या व्यक्तीला याची काहीही कल्पना नसते. मधुमेह हा खालील आजारांना आमंत्रण देतो १)उच्च र...

Regal Assets

Our Company Regal Assets was founded by young entrepreneur and investor Tyler Gallagher. The company started its operations with a small investment and a big vision: to simplify, innovate and rejuvenate the alternative assets investment landscape which was still operating under heavy bureaucracy and unnecessary hurdles. 10 years later, with zero additional startup capital and a lot of persistence, Regal Assets is the highest rated alternative assets firm in the country, with recognition from the likes of  Forbes, Smart Money, the Huffington Post  and many others. The company was also ranked #20 in the U.S. by the famous  INC 500  in the financial services category, and subsequently featured on the prestigious Reuters Sign on Times Square to congratulate them on their victory. Mission Regal Assets aims to be every investor’s one stop shop when it comes to metals and cryptos investing. The company however specializes in helping individual investors add me...