Skip to main content

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

परदेशात जाणारे 'इतके' विद्यार्थी भारतातील वैद्यकीय प्रवेश परीक्षेत अनुत्तीर्ण

: 'परदेशात जाणारे ९० टक्के वैद्यकीय विद्यार्थी नीट परीक्षा पास करु शकलेले नाहीत. मात्र आता यावर वाद घालण्याची योग्य वेळ नसल्याचे' संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. भारतातून दरवर्षी हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जातात.काही देशांमध्ये एमबीबीएसची पदवी भारतापेक्षा कमी खर्चात मिळू शकते हे यामागचे मुख्य कारण आहे.तसेच परदेशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे हे भारतातील प्रवेश प्रक्रियेपेक्षा सोपे आहे. भारतात मर्यादित जागांसाठी खूप स्पर्धा पाहायला मिळत असल्याचेही ते म्हणाले. हे तीन देश परदेशात जाणाऱ्या ६०% भारतीयांपर्यंत पोहोचतात वैद्यकीय शिक्षणासाठी बाहेर पडणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांपैकी ६० टक्के विद्यार्थी चीन, रशिया आणि युक्रेनमध्ये पोहोचतात. त्यापैकी २० टक्के विद्यार्थी एकट्या चीनमध्ये जातात. या देशांमध्ये संपूर्ण एमबीबीएस अभ्यासक्रमाची फी साधारण ३५ लाख रुपये आहे. ज्यामध्ये सहा वर्षांचे शिक्षण, तेथे राहणे, प्रशिक्षण देणे आणि भारतात परतल्यावर स्क्रीनिंग चाचणी पास करणे यांचा समावेश आहे. त्या तुलनेत, भारतातील खासगी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाची केवळ शिकवणी फी ४५ ते ५५ लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहे. दरवर्षी साधारण २५ हजार वैद्यकीय विद्यार्थी परदेशात दरवर्षी २० ते २५ हजार वैद्यकीय विद्यार्थी परदेशात जातात असा अंदाज आहे. भारतात वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी, एखाद्याला नीट प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. दरवर्षी सात ते आठ लाख विद्यार्थी येथे नीट उत्तीर्ण होतात. पण देशात मेडिकलच्या ९० हजारांच्याच जागा आहेत. यापैकी अर्ध्याहून अधिक जागा अशा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आहेत जिथे शिक्षण स्वस्त आहे, पण नीटमध्ये चांगले गुण मिळाले तरच तिथे प्रवेश घेता येतो. खासगी महाविद्यालयांमध्ये सरकारी कोट्यातील जागांवर प्रवेश घेण्यासाठी देखील नीटमध्ये उच्च गुण आवश्यक आहेत. गुण कमी असल्यास खासगी महाविद्यालयात सरकारी कोट्यातील जागांवर प्रवेश मिळत नाही आणि मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश शुल्क खूप जास्त असते. भारतात मॅनेजमेंट कोट्यातून वैद्यकीय शिक्षण खूप महाग देशभरातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील मॅनेजमेंट कोट्यातील जागाही २० हजारांच्या आसपास आहेत. यामध्ये देखील एनआरआय कोट्यातील जागा दिल्या जातात. त्यांची फी देखील खूप जास्त आहे. मॅनेजमेंट आणि एनआरआय कोट्यातून ४ ते ५ वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी उमेदवारांकडून साधारण ३० लाख ते १.२० कोटी रुपये शुल्क आकारले जाते. वर्षानुवर्षे त्यातील १४ ते २० टक्के रक्कम इतर वस्तूंवर खर्च केली जाते. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर हॉस्पिटलमध्ये एक वर्षाची इंटर्नशिप करावी लागते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/hRNmKjl

Comments