म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई अकरावी आणि आयटीआय प्रवेशामध्ये कमालीची घट दिसत असताना इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेशात मात्र २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. तर बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश १०० टक्के पूर्ण झाले आहेत. तंत्र शिक्षण संचालनालयाअंतर्गत पार पडणाऱ्या इंजिअनीअरिंग पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया नुकतीच पार पडली. यंदा या प्रवेशात कमालीची वाढ दिसून आली. यंदा तंत्र संचलनालयातर्फे विद्यार्थ्यांना या पदविका अभ्यासक्रमाबाबत माहिती मिळावी या उद्देशाने 'स्कूल कनेक्ट' हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. याचा परिणाम म्हणून यंदा इंजिनीअरिंग पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश ६० टक्के इतके झाले आहेत. २०१८मध्ये हे प्रवेश ४१ टक्के इतकेच झाले होते. तर बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश यंदा १०० टक्के झाले आहेत. इंजिनीअरिंग पदविका अभ्यासक्रम नेमका काय आहे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने आम्ही शाळांपर्यंत पोहोचून विशेष उपक्रम हाती घेतल्याचे तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी सांगितले. या माध्यमातून मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांच्यापर्यंत तंत्रनिकेतनांची माहिती पोहचवली. शिक्षकांना यामध्ये नेमक्या काय सुविधा आहेत, याचीही माहिती करून दिली. विद्यार्थ्यांना आभासी टूर घडविल्याचेही मे म्हणाले. या विशेष उपक्रमात राज्यातील सर्व तंत्रनिकेतनांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी विशेष मेहनत घेतली. तर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत आणि विभागाचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता यांनीही विशेष मार्गदर्शन केल्याचे डॉ. वाघ म्हणाले. यामुळेच प्रवेश वाढले. येत्या काळात तंत्र निकेतन अधिक सक्षम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमासाठी वर्ष निहाय प्रवेश वर्ष -- एकूण संस्था -- प्रवेश दिलेले विद्यार्थी -- टक्केवारी २०१८-- १९ ४११ -- ५१५५५ -- ४१ २०१९-- २० ३७८ -- ५५०२३ -- ५० २०२०-- २१ ३७६ -- ६२१२२ -- ६०
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3sJeqXN

Comments
Post a Comment