Skip to main content

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

करिअरसाठी उपयुक्त टेस्ट..

करिअरसाठी उपयुक्त टेस्ट..
आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्या मुलाचं करिअर हा आई-वडिलांसाठी खूप संवेदनशील विषय असतो. मुलांचा कल ठरवायला मदत करणाऱ्या काही नवीन चाचण्या आता उपलब्ध झाल्या आहेत.

आजकाल आपल्या सर्वच समस्या अगदी टोकापर्यंत गेल्या आहेत. शिक्षण, नोकरी, लग्न, संतती, त्यांचे प्रश्न.. यादी संपतच नाही. या लेखात आपल्या पाल्याच्या करिअर गाइडन्सबद्दल विचार करणार आहोत.
‘‘आमचा मुलगा ऐकतच नाही..’’
‘‘आमची मुलगी अभ्यास करते, पण ऐन परीक्षेत काय होते कोणास ठाऊक..’’
‘‘इतका खोडय़ा करतो आहो हा.. रोज तक्रारी..’’
‘‘आमचा बंटी फारच हायपर आहे. कसे त्याला आवरावे तेच कळत नाही.’’
‘‘त्याच्या लक्षात कसे राहात नाही तेच कळत नाही.’’
असे संवाद आपण रोज कुठे ना कुठे ऐकत असतो. त्यांची समस्या खरी असते. पण त्यावर नेमके काय करायचे तेच समजत नसते. खरेतर प्रत्येकामध्ये काही वैगुण्य तर काही चांगली वैशिष्टय़े निसर्ग बहाल करीत असतो. ती वेळीच ओळखता आली नाही तर पैसा, श्रम व मुख्य म्हणजे वेळ (वय) वाया जातो. म्हणजे कल्पना करा आपण मुलाला इंजिनीअरिंगला टाकले. पहिल्या वर्षी एक-दोन विषय गेले. दुसऱ्या वर्षी असाच मागे पडला आणि नंतर ते जमत नाही दुसरे काय असा विचार सुरू झाला तर? अट्टहास कोणाचा का असेना, पण गेलेली दोन वर्षे, त्याचेसाठी भरलेली गलेलठ्ठ फी आणि त्याने काहीका होईना पण घेतलेले श्रम हे भरून येणार? त्याहीपेक्षा त्याचा आत्मविश्वास खालावला तर? मग तर काय त्यासाठी किती डॉक्टर्स, किती समुपदेशक.. काही विचारूच नका.
कुंडली किंवा इतर पारंपरिक साधनांनी याची उकल करता येते. पण मुलांचा कल ठरवण्यासाठी शास्त्रीय किंवा वैज्ञानिक अशी पद्धत आहे का याचा शोध घेता पुढील काही पद्धतींचा अवश्य विचार करता येईल असे दिसते.
हॉवर्ड गार्डनर हे एक नोबेल विजेते. मुले का मागे पडतात किंवा पुढे जातात याचा विचार करताना त्यांनी असा सिद्धांत मांडला की ‘प्रत्येक मूल हे हुशार असतेच. फक्त प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या आघाडय़ांवर हुशार असते. काही मुले काही बाबतीत खूप पुढे असतात, पण तीच मुले काही बाबतीत फार मागे असतात.’
याचा अर्थ प्रत्येक जिवामध्ये काही ना काही तरी गुणवैशिष्टय़े निसर्ग बहाल करीत असतो. ती वैशिष्टय़े वेळीच ओळखून त्याप्रमाणे त्याला किंवा त्याच्या पालकांना योग्य असे मार्गदर्शन करू शकलो तर खूप काही चांगले घडू शकते.
गार्डनर यांनी अशी आठ वैशिष्टय़े नमूद केली आहेत. आपल्याकडे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यातले हे आयाम अगदी चांगल्या पद्धतीने सांगण्याचे काम त्यांनी केले आहे. ती पुढीलप्रमाणे-
१) स्वत:ची ओळख : काही मुलांचा आत्मविश्वास खूप दांडगा असतो. आणि त्याप्रमाणे ते आपापले मत मांडून त्याप्रमाणे स्वत:ला सिद्धही करीत असतात. अशी मुले कुठेही यशस्वी होऊ शकतात. कारण सगळे कसे आखीवरेखीव, शिस्तबद्ध आणि पूर्वनियोजित असे असते. अंतर्मुख होऊन ती योग्य विचार करायला सक्षम असतात.
२) तार्किक : योग्य असा तर्कशुद्ध विचार करणे. आपले मत समोरच्याला पटेल असे मांडणे. ही मुले नियोजन क्षेत्रात, सॉफ्टवेअर डिझाइनिंग, मार्केटिंग अशा क्षेत्रात जाऊ शकतात.
३) बहुभाषिकत्व : भाषा चांगली असणे, प्रभावी असणे, एकापेक्षा अनेक भाषांमध्ये पारंगत असणे या गोष्टींची आजच्या जगात गरज आहे.
४) निसर्गाविषयी : निसर्गाची आवड, जाण, ओढ या गोष्टी काही जणांना उपजत असतात. त्यांना प्राणी, पक्षी, वृक्ष व त्यांची भाषाही अवगत असते.
५) सामाजिक जाण : काही मुले एकलकोंडी असतात तर काहींचे मित्रमैत्रिणींशिवाय पान हलत नाही. इतरांच्या भावना समजून घेणे, त्यांना वेळोवेळी मदत करणे हेही एक बुद्धिमत्तेचे लक्षण सांगितले आहे. यांची भाषाजाण चांगली असेल तर साहित्यिक होऊ शकतात. तर निसर्गजाण चांगली असेल तर चांगले समाजसेवक तयार होतात.
६) दृश्यात्मक जाण : दृश्य अशा सर्व गोष्टींचे ज्ञान असणे हे एक कौशल्य आहे. रंग, रचना, आकार, चित्र, शिल्प इत्यादींची जन्मत: जाण असणे हे एक उत्तम कलाकाराचे लक्षण असते.
७) शारीरिक कौशल्य : काही मुले ही कायम मैदानात दिसतात. त्यांना शालेय अभ्यासही घरापेक्षा मैदानातच करायला आवडतो. खरे तर अभ्यासापेक्षा खेळातच त्यांना रस जास्त असतो. चपळता, उत्साह, गती, शारीरिक नियंत्रण यामुळे त्यांना खेळाचीच जास्त आवड असते.
८) संगीतकौशल्य : जणू मागच्या जन्मात कोणीतरी महान गायक असावा आणि राहिलेली संगीत सेवा पूर्ण करायला आत्ता जन्म घेतला असावा अशी ताल-स्वर-लय यांची जाण काही मुलांना लहानपणीच असते. अशांना संगीतात करिअर करू न देता अभ्यासात मागे पडला म्हणून फटके मारत बसलो तर काय होईल?
अशा या अष्टपैलूंचा विचार त्यांनी मांडला. यावर बऱ्याच संशोधनाअंती एक पद्धत विकसित केली गेली. त्याला आजकाल डीएमआयटी (DMIT – Dermatoglyphics Multiple Intelligence Tests) या नावाने संबोधले जाते.
आपल्या बोटांच्या पहिल्या पेऱ्यांवर (नख असलेले) काही रेषा असतात. त्यांचा संबंध सरळ मेंदूशी असतो. बाळ आईच्या पोटात चौथ्या- पाचव्या महिन्यात असतानाच आपल्या मेंदूमध्ये ही कौशल्ये पॅटर्नस्वरूपात तयार होतात. ती निसर्गदत्त देणगीच म्हणा हवे तर. हीच कौशल्ये हातांच्या बोटांच्या या पेरांवरील रेषांवरून वाचता येतात. आपल्याला माहीत असेलच की गुन्हेगारशोध मोहिमेत किंवा एखाद्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमध्येही याच बोटांच्या अशा रेषांचा अभ्यास केला जातो. आणि ही पद्धत अगदी शास्त्रीय म्हणून जगभर वापरली जाते.
या रेषांचे वैशिष्टय़ म्हणजे त्या स्त्री, पुरुष अशा प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या असतात आणि आयुष्यात कधीही बदलत नाहीत.
डीएमआयटी या चाचणीमध्ये तुमच्या हाताच्या बोटांच्या या पेरांचे ठसे स्कॅन करून घेतले जातात, ते संगणकाच्या माध्यमातून मूळ सॉफ्टवेअरकडे पाठविले जातात. तिथे यावरून एक सुमारे ४५ रंगीत पानांचा रिपोर्ट तयार होतो जो आपल्याकडे पाठविला जातो. या रिपोर्टवरून कदाचित सगळ्यांनाच समजेल असे नाही. त्यामुळे या रिपोर्टमध्ये आलेल्या आपल्या दहा कौशल्यांपैकी कोणत्या कौशल्याच्या आधारे आपले व्यक्तिमत्त्व खुलवू शकता, कोणत्या शाखेची निवड आपण करू शकता अशा विविध पैलूंना समजावून सांगण्यासाठी रीतसर प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञाकडून किमान एक तासाचे समुपदेशन मिळते. हेच समुपदेशन आपल्या भावी आयुष्यात खूप उपयुक्त ठरते.
या पेरांवरील रेषा कधीही बदलत नाहीत, त्यामुळे आयुष्यात कधीही हा रिपोर्ट काढला तरी तोच येतो. अर्थात आयुष्यात एकदाच हा रिपोर्ट काढावा लागतो.
या रिपोर्टमध्ये एकूण दहा गुणांचा विचार केला जातो. वरील आठव्यतिरिक्त आणखी दोन गुणवैशिष्टय़ांचा विचार आहे. तो म्हणजे बोटांमधील कलात्मकता आणि स्मरणशक्ती. यातून आणखीही सखोल मार्गदर्शनाकडे जाता येते. या दहा गुणवैशिष्टय़ांव्यतिरिक्त बऱ्याच आयामांचा विचार या रिपोर्टद्वारे होत असतो.
तसेच या रिपोर्टचा उपयोग फक्त विद्यार्थीदशेतच होतो असे नाही. त्याचे फायदे अनेक आहेत.
फायदे : विद्यार्थी मुलामुलींसाठी:
१) त्यांच्यातील नैसर्गिक सामथ्र्य व बुद्धिमत्ता कोणती हे समजते.
२) एकूण १० कौशल्यांमधून त्यांच्यासाठी १०वी / १२वीनंतर शाखानिवड करण्यासाठी शास्त्रीय मदत.
३) चुकीची किंवा लादली गेलेली शाखानिवड केल्यामुळे वाया जाणारी वर्षे, त्याची फी, टय़ूशन, इ. अफाट खर्चाची बचत होते. जर अगोदरच हा सल्ला हाताशी असेल तर! विद्यार्थ्यांचा मनस्ताप व यामुळे कमी झालेला आत्मविश्वास याची किंमत तर कशी करणार?
४) उपजत संवादकौशल्य कोणत्या पद्धतीचे असेल हे समजल्याने त्यांचे एकटेपण संपते व त्याची अन्य मुलामुलींसोबत खेळीमेळीत वाढ होते.
५) प्रत्येक विद्यार्थ्यांची अभ्यासाची पद्धत वेगवेगळी असते. ती अचूक समजल्यावर प्रगती व आत्मविशास वाढायला मदत होते.
६) शिकण्याची नैसर्गिक पद्धत समजल्याने ताणतणावरहित अशा मानसिकतेमुळे विषय समजणे सोपे जाते.
७) अनावश्यक शिकवणीवर्ग व अभ्यासक्रम यावर होणारा खर्च, वेळ व श्रम यांची बचत होते.
८) विद्यार्थी-पालक नाते आनंदी व सुदृढ करण्यासाठी विशेष मदत.
९) विद्यार्थ्यांला चांगले समजून घेण्यासाठी या चाचणीचा खास उपयोग!

पती-पत्नी नात्यासाठीही उपयुक्त :
दोघांमधील आवडीनिवडीवर योग्य असे भाष्य करता येते. एकमेकांसाठी तडजोड करण्याच्या जागा नेमकेपणाने शोधता येतात. एकमेकांना समजून घेण्यात खूप मदत होते. विसंवाद कमी करण्यासाठी, नात्यातील गोडी वाढवून एकोपा निर्माण करण्यासाठी योग्य असा सल्ला मिळतो.

नोकरी-व्यवसायाच्या निवडीवेळी :
आपल्याला नैसर्गिक व उपजत कौशल्य समजल्याने शक्य असेल तेव्हा योग्य अशा नोकरी व व्यवसायाची निवड करणे सोपे जाते. त्यामुळे संघर्षांचे वा कष्टाचे प्रमाण कमी ठेवता येते.
कलाकौशल्ये :
कलाकार हा अभिनय, गायन, वादन, चित्रकार, नृत्य, इ. कोणत्याही प्रकारचा असू शकतो. आपण यातील नेमके कशात वाकबगार होऊ शकाल ती निवड करण्यास साहाय्यभूत पद्धत.
थोडक्यात :
१) कोणत्याही वयाच्या स्त्री-पुरुषांसाठी आवश्यक.
२) जेवढे लहान वा अगोदरच्या वयात करू तेवढे जास्त फायदेशीर.
३) हातांच्या बोटांचे पहिल्या पेराचे ठसे स्कॅन करून घेतले जातात. त्यावरून संगणकाच्या साहाय्याने सुमारे ४५ रंगीत पानांचा रिपोर्ट मिळतो.
४) विशेष प्रशिक्षित अशा तज्ज्ञांकडून एक तासाचे समुपदेशन फोनवर मिळते.
५) आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी, आयुष्यभर उपयुक्त ठरणारी, मात्र आयुष्यात एकदाच करावी लागणारी अशी चाचणी.
याशिवाय ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder) किंवा ADD (Attention Deficit Disorder) अशा अन्यही काही चाचण्या आजकालच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात आपल्या पाल्यासाठी उपयुक्त ठरतात.
काही मुले खरीच हायपर अ‍ॅक्टिव्ह असतात. त्यांना सांभाळणे ही खरीच पालकांची परीक्षा असते. सतत काही ना काही टोकाचे उद्योग चालू असतात. दोन मिनिटेसुद्धा एका जागी बसत नाहीत. अति मस्तीखोर असे यांचे वर्णन करता येईल. यातला दुसरा प्रकार म्हणजे अति मस्ती नसेल तर लक्षच न देणारी मुले. या दोहोंसाठी आज तरी वैद्यकीय उपचाराची गरज असते. मात्र आजकाल केली जाणारी टेस्ट ही सायकोमेट्रिक टेस्ट आहे.
मात्र या नवीन पद्धतीमध्ये त्याला डोक्याला एक चक्क हेडफोनसारखा प्रकार लावून संगणकावर विशेष तयार केलेले गेम्स खेळायला दिले जातात. हेडफोनशी असलेल्या डिवाइसवरून त्याच्या मेंदूमधून निघणारे तरंग स्क्रीनच्या मागे चालू असलेल्या संगणकप्रणालीमार्फत साठविले जातात. त्याच्या अभ्यासावरून त्याला खरीच अशा औषधांची गरज आहे का ते ठरविले जाते. अन्यथा याच सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बनविलेल्या अन्य खेळांतून त्याला मन शांत करण्याची कला शिकविली जाते.
सर्वात मुख्य म्हणजे या कोणत्याही चाचण्यांमध्ये आपणास कोणत्याही स्वरूपाच्या गोळ्या किंवा औषध दिले जात नाही. त्यामुळे साइड इफेक्ट्सची शक्यताच नसते.

संपर्क क्र: 09619460255; 08850159873; 09702711568.

Comments

Popular posts from this blog

BPNL Recruitment 2022: पशुसंवर्धन विभागात दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी

BPNL : भारताच्या पशुपालन निगम लिमिटेडमध्ये (Animal Husbandry Corporation of India Limited, BPNL) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. पशुपालन निगम लिमिटेडमध्ये ट्रेनिंग कंट्रोल ऑफिसर (Training Control Officer), ट्रेनिंग कंट्रोल इंचार्ज (Training Control Incharge),ट्रेनिंग कोऑर्डिनेटर (Training Coordinator), ट्रेनिंग असिस्टंटची (Training Assistant) अनेक पदे भरली जाणार आहेत. बीपीएनएल भरती २०२२ () साठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आली आहे. बीपीएनएल भरती २०२२ अंतर्गत एकूण ७८७५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पशुपालन निगम लिमिटेड ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या भरतीच्या जाहिरातीनुसार, २१ ते ४५ वर्षे वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. रिक्त जागांचा तपशील ट्रेनिंग कंट्रोल ऑफिसरच्या ७५ रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठ...

UPSC ESE पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या तपशील

ESE pre-exam 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा परीक्षा (ESE) २०२२ ची तारीख जाहीर केली आहे. आयोगातर्फे अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर तारीख जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेची तयारी करणारे उमेदवार वेबसाइटवर वेळापत्रक तपासू आणि डाउनलोड करू शकतात. यूपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ईएसई पूर्व परीक्षा २० फेब्रुवारी २०२२ रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येतील. सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत ही परीक्षा होईल. परीक्षा सुरु होण्यापुर्वी १५ दिवसांच्या आत उमेदवारांना यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा प्रवेशपत्र २०२२ डाउनलोड करता येईल. सर्व उमेदवारांना अधिकृत वेबसाइट तपासत राहण्याचा सल्ला दिला जातो. मुख्य परीक्षेची तारीख पूर्व परीक्षेनंतर जाहीर केली जाईल. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेस बसण्यास पात्र असतील. इंजिनीअरिंग सेवा (प्राथमिक/फेज-I) परीक्षेत दोन वस्तुनिष्ठ प्रकारच्या (multiple choice) प्रश्नपत्रिका असतील. ही परीक्षा जास्तीत जास्त ५०० गुणांची असेल. (पेपर १ - २०० गुण आणि पेपर २- ३०० गुण). यूपीएससीतर्फे प्र...

पांढरे विष- साखर - एकदा हा लेख आवर्जून वाचा

साखर ही उसाच्या रसावर रासायनिक प्रक्रिया करून बनविली जाते. प्रोटीन्स व खजिन द्रव्यांचा अभाव साखर ही उसाच्या रसावर रासायनिक प्रक्रिया करून बनविली जाते. प्रोटीन्स व खजिन द्रव्यांचा अभाव असूनही चवीने मधुर व दिसायला पांढरीशुभ्र असणारी साखर लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वानाच आवडते. आधुनिक काळात , तर प्रत्येक तयार पदार्थात साखरेचाच समावेश केलेला असतो. जाम , बिस्किट्स , चॉकलेटस् , केक , मिठाई अशा अनेक पदार्थात साखरेचा सढळपणे वापर केला जातो. साखर बनविण्याची प्रक्रिया   उसाचा रस हा पचनास अतिशय हलका असतो. या रसाला अटविले जाते व त्यात चुना घालून उकळल्याने त्यातील मळ काढून टाकता जातो. नंतर सतत आटवीत राहिल्यामुळे व अनेक रसायनिक पदार्थाचा वापर केल्यामुळे हाच उसाचा घट्ट रस पचण्यास कठीण होतो. सल्फर डायऑक्साईड वायू , फॉर्मालीन , रिफायिनग व ब्लिचिंग या सर्व रासायनिक प्रक्रियांतून घट्ट रस आटविला जाऊन , पांढरीशुभ्र दाणेदार साखर बनवली जाते. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर साखर एक शुद्ध रासायनिक पदार्थ बनतो व अशी ही साखर वर्षांनुवर्षे टिकते. ती कधीही खराब होत नाही. कारण , रासायनिक...

गिलोय एक संजीवनी - गिलोय से होने वाले शारीरिक फायदे

Harbayu wellness care Dr.Ravindra Nandedkar गिलोय चूर्ण गिलोय/गुळवेल ज्यूस      राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त डॉ.रविंद्र नांदेडकर द्वारा संशोधित की गयी Diaba-T मैं इस्तेमाल की गई गिलोय/गूलेठी/गुलवेल के नाम भी जाना जाता है। आइये हम गिलोय से होने वाले शारीरिक फायदे की ओर देखें :-      गिलोय एक प्रकार की लता/बेल है, जिसके पत्ते पान के पत्ते की तरह होते है। यह इतनी अधिक गुणकारी होती है, कि इसका नाम अमृता रखा गया है। आयुर्वेद में गिलोय को बुखार की एक महान औषधि के रूप में माना गया है। गिलोय का रस पीने से शरीर में पाए जाने वाली विभिन्न प्रकार की बीमारियाँ दूर होने लगती हैं। गिलोय की पत्तियों में कैल्शियम, प्रोटीन तथा फास्फोरस पाए जाते है। यह वात, कफ और पित्त नाशक होती है। यह हमारे शरीर की रोगप्रतिरोधक शक्ति को बढाने में सहायता करती है। इसमें विभिन्न प्रकार के महत्वपूर्ण एंटीबायोटिक तथा एंटीवायरल तत्व पाए जाते है जिनसे शारीरिक स्वास्थ्य को लाभ पहुँचता है। गिलोय में प्राकृतिक रूप से शरीर के दोषों को संतुलित करने की क्षमता पाई जाती है।      गिलोय एक बहुत...

मधुमेह पुर्ण बरा होतो का?

मधुमेह पुर्ण बरा होतो का? हो मधुमेह हा आजार नाही तर आपल्या शरीर यंत्रणेतील बिघाड आहे आणि इतर अनेक आजारांचं प्रवेशद्वार आहे आज भारतातील प्रत्येकी तीन व्यक्तीमागे एकास मधुमेह आहे किंवा पुढच्या आयुष्यात कधी तरी होणार आहे. आज हीच गोष्ट कितीतरी मधुमेह तज्ञ व औषधं बनविणाऱ्या उद्योगांसाठी हवी हवीशी वाटत असली तरीही रुग्णांसाठी फारच धोकादायक आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ९०%(नव्वद टक्के)रुग्ण याबद्दल जागरूक नाहीत. काहींना तर हा विषयच नकोसा वाटतो. परिणामी पुढे जाऊन आपल्या पदरात काय वाढून ठेवले आहे, ह्याची जरासुद्धा खबरबात ते घेत नाहीत. काही रुग्ण तर फक्त "माझी तज्ञ डॉक्टरांकडे ट्रिटमेंट सुरू आहे आता माझी शुगर नॉर्मल आहे मी फक्त  त्यांचाच सल्ला घेतो आहे" असे म्हणून सर्व जबाबदारी त्यांच्या डॉक्टरांवरच टाकत असतात. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही कि गोळी सुरू आहे म्हणून कंट्रोल आहे नॉर्मल नाही आणि जरी गोळी सुरू असली तरी त्यांच्या शरीरात झालेला बिघाड हा वाढतच असतो, पण मधुमेह असलेल्या व्यक्तीला याची काहीही कल्पना नसते. मधुमेह हा खालील आजारांना आमंत्रण देतो १)उच्च र...

Regal Assets

Our Company Regal Assets was founded by young entrepreneur and investor Tyler Gallagher. The company started its operations with a small investment and a big vision: to simplify, innovate and rejuvenate the alternative assets investment landscape which was still operating under heavy bureaucracy and unnecessary hurdles. 10 years later, with zero additional startup capital and a lot of persistence, Regal Assets is the highest rated alternative assets firm in the country, with recognition from the likes of  Forbes, Smart Money, the Huffington Post  and many others. The company was also ranked #20 in the U.S. by the famous  INC 500  in the financial services category, and subsequently featured on the prestigious Reuters Sign on Times Square to congratulate them on their victory. Mission Regal Assets aims to be every investor’s one stop shop when it comes to metals and cryptos investing. The company however specializes in helping individual investors add me...